शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Category बालसाहित्य

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

एक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल .  सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि… Continue Reading →

निर्मिती

खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या… Continue Reading →

धूर्त गाढव

एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहात होता. आपल्या छोटेखानी शेतात तो खूप कष्ट करून भाजीपाला पिकवायचा. रोज पहाटे उठून शेतीची सगळी कामं करून जी काही भाजी तयार होईल त्यातली थोडी कुटूंबासाठी ठेऊन उरलेली सगळी भाजी आठवड्यातून एकदा आठवडी बाजारात नेऊन… Continue Reading →

मानवतेचं झाड

उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून… Continue Reading →

पावसाची मैत्री

पाऊस आणि धरणी एकमेकांचे खूप छान आणि जुने मित्र होते. मित्र म्हटलं कि, आपलेपणा, मनमोकळेपणा, रुसवे-फुगवे, हक्क, जबाबदारी या सगळ्या गोष्टी आल्याच. पावसाचं आणि धरणीचं मैत्रीचं नातंही असंच सुंदर आणि निरागस होतं. पाऊस दूर आभाळाच्या देशातून दरवर्षी, अगदी न चुकता… Continue Reading →

एकीचे बळ मिळते फळ

वार्षिक परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. दे धम्माल ….!!!मित्रांची भेट, खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं ही  रोजची ठरलेली कामं. अभय आणि त्याचे पाच-सहा मित्र सुट्टी पडल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ शेजारच्या बागेत खेळायला जायचे. त्यांच्या परिसरात हीच एकमेव… Continue Reading →

प्रायश्चित

मर्कटेश्वर राज्यात मर्कट नावाचा एक शूर राजा राज्य करीत होता. राजा आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत असे. सर्व सुखसोई उपलब्ध असल्याने प्रजाही खूप सुखी होती. प्रजा होती सुखी पण राजा होता दुःखी. त्याच्या  दुःखाचे कारण काय ? तर जन्मत:च राजाला… Continue Reading →

वृक्षवल्ली आम्हा सोयरे

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, अर्णवला निसर्ग खूप आवडायचा. अगदी लहान असल्यापासूनच घरच्या छोटेखानी बागेत त्याचा वेळ खूप छान जायचा. तो फुला- पानांमध्ये तासनतास रमायचा. फुलांच्या नवनवीन रंगांचं त्याला फार आकर्षण. नानाविध फुलं, त्यांचे सुगंध या साऱ्यांचच त्याला फार… Continue Reading →

सृष्टी सौंदर्य

दूर आभाळाच्या देशात परीस्थानात अनेक सुंदर प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी. या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांचीच लाडकी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, डोक्यावर… Continue Reading →

निसर्ग नियम

गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. आपल्या चूका मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहीजे. यातच संपूर्ण सजीवसृष्टीचं भलं आहे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर कल्पक “मनुष्यप्राणी” जन्माला घातला. सगळ्या सजीवांत अत्यंत हुशार आणि… Continue Reading →

« Older posts

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑